कोल्हापूर मधील जिल्ह्यातील 7 बंधारे पाण्याखाली

 कोल्हापूर मधील जिल्ह्यातील 7 बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 2.54 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी आणि तेरवाड, कासारी नदीवरील यवलूज असे 7 बंधारे पाण्याखाली आहेत.

https://youtu.be/VBtT96DN1vE

जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी 2.54 टीएमसी, तुळशी 1.33 टीएमसी, वारणा 11.85 टीएमसी, दूधगंगा 4.53 टीएमसी, कासारी 0.92 टीएमसी, कडवी 1.28 टीएमसी, कुंभी 0.92 टीएमसी, पाटगाव 1.61 टीएमसी, चिकोत्रा 0.51 टीएमसी, चित्री 0.56 टीएमसी, जंगमहट्टी 0.49 टीएमसी, घटप्रभा 1.43 टीएमसी, जांबरे 0.54 टीएमसी, आंबेआहोळ 0.89 टीएमसी, सर्फनाला 0.03 टीएमसी व कोदे लघु प्रकल्प 0.08 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 17.10 फूट, सुर्वे 19.5 फूट, रुई 45 फूट, इचलकरंजी 43.2 फूट, तेरवाड 39.9 फूट, शिरोळ 31 फूट, नृसिंहवाडी 24 फूट, राजापूर 13.6 फूट तर नजीकच्या सांगली 7.9 फूट आणि अंकली 8.1 फूट अशी आहे. 7 dams in Kolhapur district under water

ML/ML/PGB
1 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *