फेसबुक ग्रुपवर जोडले राज्यातील 6 हजार बांबू शेतकरी !

 फेसबुक ग्रुपवर जोडले राज्यातील 6 हजार बांबू शेतकरी !

सिंधुदुर्ग, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): चीन,व्हियेतनाम येथून हजारो कोटी रुपयांची अगरबत्ती काडी आपल्या देशात आयात होते.चीनची अर्थ व्यवस्था बांबूवर चालते. मग कोकणाची अर्थ व्यवस्था बांबूवर का चालत नाही ? कोकणात पडीक जमीन मोठ्या प्रमाणात असूनही बांबू शेती का केली जात नाही नाही ?असा सवाल करीत बांबूची चळवळ उराशी बाळगून विश्वनाथ सावंत गाव नाटळ,कणकवली आणि वरिष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर रावराणे,एडगाव,वैभववाडी यांनी दीड वर्षा पूर्वी “कोकण-महाराष्ट्र बांबू शेतकरी “हा फेस बुक ग्रुप बनविला. त्याला उदंड प्रतिसाद लाभला असून राज्यातील सुमारे 6 हजार बांबू शेतकरी एकत्र जोडण्यात यश आले आहे.

ह्या ग्रुप ने एक विश्वास संपादन केला आहे.
कोकणातील पारंपरिक बांबू शेती कशी असते. हे राज्यातील शेतकऱ्यांना दाखविण्याचा प्रयत्न ग्रुप मुळे झाला आहे. विश्वनाथ सावंत हे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते असून त्यांनी आपल्या नाटळ गावच्या नदीतील 17 किमी लांब गाळ काढून साफ केली आहे.त्यांनी नदीला पक्का बंधारा बांधला आहे.
सामाजिक संस्थांच्या सहकार्यातून हे काम केले आहे. तर ज्ञानेश्वर रावराणे हे वरिष्ठ पत्रकार असून त्यांनीही शासनाच्या मदतीने आपल्या गावातील नदीचा गाळ काढून गावाला महापुरा पासून वाचविले आहे.या दोघांनी आपल्या गावात काम करून सामाजिक बांधिलकी जपत अवघ्या कोकणाला आदर्श घालून दिला आहे.

आता हे दोघेही कोकणातील हिरवं सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बांबू शेतीचे महत्व पटवून देण्याचं काम करीत आहेत.हे सामाजिक काम असून त्यात त्यांचा बांबू नर्सरी किंवा व्यासायिक दृष्टिकोन अजिबात दिसून येत नाही. बांबूतून आर्थिक समृद्धी हे कोकण विकासाचे नवे व्हिजन घेऊन सावंत आणि रावराणे हे बांबू क्षेत्रात काम करीत आहेत. या दोघांनी स्वतः थोडी फार लागवड करून तुम्हीही बांबूची शेती करा असे आवाहन केले आहे.

पत्रकार ज्ञानेश्वर रावराणे, हे बांबू शेतीवर गेली काही वर्षे सातत्याने लिखाण करीत आहेत. त्यांनी अनेक बांबू शेतकऱ्यांच्या मुलाखती घेतल्याने इतर शेतकऱ्यांना प्रेरणा मिळत आहे.बांबू शेतकऱ्यांची फसगत होऊ नये या साठी त्यांचा प्रयत्त्न असतो.कोकणातील पोषक हवामान,प्रचंड पाऊस,
सुपीक जमीन व सह्याद्रीच्या कडेकपारीत उत्तम दर्जाचा बांबू होतो.येथील स्थानिक प्रजातीच्या बांबूने मुंबई सहित राज्याच्या इतर भागातील बाजारपेठेत दबदबा कायम ठेवला आहे.

कोकणात होणारी बांबू शेती.कंदमुळांची काढणी, कंदमुळाने होणारी लागवड,बांबूची मशागत,
बांबूची तोडणी,बांबू तोड कामगार,मजूर , स्थानिक व्यापारी,बांबूचं मार्केट,याची माहिती या फेसबुक ग्रुपवर देत असतात.त्यामुळे काही महिन्यात या ग्रुपने विश्वास संपादन केला आहे.यातून पर्यावरण पूरक काम होत आहे.

सध्या बाजारात नाना तऱ्हेच्या बांबूच्या जाती आलेल्या आहेत.त्याला मार्केट आहे का ?बांबूला फुलोरा येतो का? याचा अभ्यास असायला हवा.उगाच कोण सांगतो म्हणून बांबू लागवड करू नये.नंतर कोणाला दोष देऊ नये असं रावराणे यांचं म्हणणं आहे. बोरबेट,
माणगा,सोन चिवा,मेस या जातीच्याच बांबूची लागवड करावी.इतर दुसऱ्या कोणत्या जातीची रोप लावायची असतील तर स्वतःच्या जबाबदारीवर लागवड करावी असा सल्ला रावराणे देत असतात. कोकणातल्या माणसात हरियाली सारखी नाकोरी जखडलेली असते.ती मुळासकट उखडून टाकली पाहिजे.त्याच्या डोक्यात कुणीतरी प्रेरणा घालून दिली पाहिजे.त्यांच्या डोक्यात एकदा ठिणगी पडली की,ते स्वतःचा उरत नाही. ती बांबू लागवडीची प्रेरणा देण्याचे काम रावराणे आणि सावंत हे निष्ठेने करीत आहेत. 6 thousand bamboo farmers in Konkan added to the Facebook group!

ML/KA/PGB
19 Jun 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *