५० एलएमटी गहू आणि २५ एलएमटी तांदूळ खुल्या बाजारात

 ५० एलएमटी गहू आणि २५ एलएमटी तांदूळ खुल्या बाजारात

नवी दिल्ली, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या महागाईमुळे सर्वसामांन्यांचे बिघडलेले अर्थकारण सुधारण्यासाठी केंद्र सरकार विविध स्तरांवर प्रयत्न करत आहे. आज एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत अन्नधान्यविषयक महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने 50 एलएमटी गहू आणि 25 एलएमटी तांदूळ खुल्या बाजारात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. 2023 मध्ये एफसीआयतर्फे टप्प्याटप्प्याने गहू आणि तांदूळ यांचा साठा भारत सरकारने निश्चित केलेल्या राखीव दरासह बाजारात विक्रीसाठी उतरवला जात आहे.

ई-लिलावाच्या माध्यमातून देशांतर्गत खुल्या बाजारातील विक्री योजनेअंतर्गत (ओएमएसएस(डी)) भारतीय अन्न महामंडळातर्फे (एफसीआय) 50 लाख मेट्रिक टन गहू आणि 25 लाख मेट्रिक टन तांदूळ टप्प्याटप्प्याने खुल्या बाजारात विक्रीसाठी उतरवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. एफसीआयतर्फे गेल्या काही काळात तांदळासाठी करण्यात आलेल्या 5 ई-लिलावांचा अनुभव लक्षात घेऊन यावेळी तांदळाचा राखीव दर क्विंटल मागे 200 रुपयांनी कमी करून प्रभावी मूल्य 2900 रुपये प्रती क्विंटल ठेवण्याचा देखील निर्णय घेण्यात आला आहे. राखीव दरातील कपातीमुळे येणारा खर्च केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या देखरेखीखाली असलेल्या मूल्य स्थिरीकरण निधीमधून करण्यात येणार आहे.

सरकारने ओएमएसएस(डी) अंतर्गत खासगी संस्थांना गहू आणि तांदूळ विक्रीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे, या धान्यांची उपलब्धता वाढेल, बाजारभावातील वाढ आटोक्यात राहील आणि अन्नधान्याच्या महागाईवर नियंत्रण ठेवता येईल.

SL/KA/SL

9 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *