काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू, मृतामध्ये ६ जण महाराष्ट्रातील

श्रीनगर, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मंगळवारी दुपारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला आहे.तर २० हून अधिक लोक जखमी झाले. या भ्याड दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील संजय लेले, अतुल मोने, दिलीप डिसले, संतोष जगदाळे, कौस्तुभ गनबोटे, हेमंत जोशी या ६ जणांना आपले प्राण गमवावे लागले. संजय लेले, हेमंत जोशी आणि अतुल मोने हे तीनजण डोंबिवली येथील आहेत.
लष्कर-ए-तैयबाची शाखा द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. दरम्यान, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले की, या हल्ल्यात आमचा कोणताही हात नाही.
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांचे मृतदेह आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती दिली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील १५० ते २०० पर्यंटक काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेले आहेत त्यांना सुखरुप परत आणण्यासाठी देखील विशेष विमान पाठवण्यात येत आहे.नागरिकांना मदतीसाठी पुढील हेल्पलाईनवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. 9370960061
मुंबईत मंत्री आशिष शेलार आणि मंत्री मंगलप्रभात लोढा हे मुंबई विमानतळ येथे समन्वयासाठी असतील, तर पुणे विमानतळावर मंत्री माधुरीताई मिसाळ यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मंत्री गिरीश महाजन हे श्रीनगरसाठी रवाना होत आहेत.
मृत संजय लेले आणि दिलीप डिसले यांचे पार्थिव श्रीनगर ते मुंबई या एअर इंडियाच्या विमानाने मुंबईत आणण्यात येईल. हे विमान श्रीनगर येथून दुपारी 12.15 वाजता निघेल. पुण्यातील कौस्तुभ गणवते आणि संतोष जगदाळे यांचे पार्थिव हे सायं. 6 वाजता निघेल आणि पुण्यात आणण्यात येईल. हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचे पार्थिव घेऊन दुपारी 1.15 वाजता श्रीनगर येथून विमान निघेल आणि मुंबईत पोहोचेल. अशी माहिती
9370960061 हा मोबाईल क्रमांक आहे