हतनूर धरणाचे चौदा दरवाजे उघडले…
जळगाव, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. मध्यप्रदेश, विदर्भ आणि हतनूर पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली .यामुळे हतनूर धरणाचे 41 पैकी 14 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले आहेत तापी नदी पात्रात 60 हजार 777 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तापी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अजून तापी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे.
ML/ ML/ SL
5 August 2024