पर्यारण रक्षणासाठी दीड कोटीचा आराखडा
मुंबई, दि.3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पर्यावरण रक्षणाच्या उद्देशाने राज्यभरात ‘माझी वसुंधरा’ मोहीम राबविण्यात येत असून, या प्रयत्नात महाड नगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. मोहिमेचा एक भाग म्हणून पर्यावरण रक्षणासाठी दीड कोटी रुपयांचा प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला आहे. परिणामी, शहर पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या उद्देशाने विविध उपक्रमांच्या अंमलबजावणीचे साक्षीदार होईल, तसेच विकास प्रकल्प देखील सुरू करेल.
‘माझी वसुंधरा’ अभियानातून जमीन, वायू, पाणी, ऊर्जा आणि आकाश या पंचमहाभुतांवर लक्ष केंद्रित करून त्यात सुधारणा घडवण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना पर्यावरणपूरक सवयी अंगीकारण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही विविध स्तरावर भरघोस बक्षिसांची स्पर्धा आयोजित करून स्थानिक स्वराज्य संस्थांना अभियानामध्ये सहभागी करून घेतले आहे. महाड नगरपालिका क्षेत्रामध्ये वृक्षारोपण, जनजागृती, स्वच्छता अभियान व विविध उपक्रम राबवले जात आहेत.
याच अभियानामुळे महाड नगरपालिकेने सहभाग घेत २०२३ मध्ये कोकण विभागात अव्वल क्रमांक प्राप्त करत दीड कोटीचे बक्षीस मिळविले आहे. बक्षिसाच्या रकमेतून स्वच्छता विषयक कामे करून घेण्यासाठी नगरपालिकेने सविस्तर प्रकल्प आराखडाही तयार केला आहे.
नगरपालिकेच्या तसेच इतर मोकळ्या जागेमध्ये वृक्ष लागवड करणे, शहरामध्ये वनराई तयार करणे, मियावाकी वने निर्माण करणे, ऊर्जा बचत, सौर ऊर्जेसाठी प्रकल्प राबवणे इत्यादी कामे यामधून केली जाणार आहेत.
1.5 crore scheme for environment protection
ML/KA/PGB
3 Feb 2024