नागपूर दंगलीचा चौकशी अहवाल आल्यानंतर प्रतिक्रिया देणे योग्य – खासदारांचे मत

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :नागपूरमध्ये घडलेल्या दंगलीचा चौकशी अहवाल येत नाही तोपर्यंत त्यावर बोलणे योग्य होणार नाही. परंतु, जे काही घडले ते पूर्णपणे चुकीचे असून सामान्य माणसाला याचा त्रास सहन करावा लागत असल्याची खंत राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. आपण इतिहासाला बदलू शकत नाही. जो इतिहास आहे तो आहे. मात्र, इतिहासाच्या नावावर जे काही केले जात आहे ते सामान्य व्यक्तींना त्रास देणारे आहे.नागपुरातील दंगल ही कोणत्याही समुदायामुळे घडलेली नाही तर राजकीय महत्वाकांक्षा बाळगणा—यांनी घडवून आणली आहे, असे मत अकोल्याहून भाजपचे खासदार अनूप धोत्रे यांनी संसदेच्या आवारात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
ML/ML/PGB 18 mar 2025