दत्तक प्रक्रियेतील अडथळे दूर करण्यासाठी जनहित याचिका दाखल

 दत्तक प्रक्रियेतील अडथळे दूर करण्यासाठी जनहित याचिका दाखल

मुंबई दि.10(एम एमसी न्यूज नेटवर्क) : भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात अनाथ मुलांची संख्या चिंताजनक आहे. सध्या अंदाजे 3.25 कोटी मुले अनाथ आहेत, तर दुसरीकडे 28 कोटी दाम्पत्य अपत्यहीन आहेत. या दोन्ही समस्यांवर दत्तक प्रक्रिया हा एक उत्तम उपाय होऊ शकतो. मात्र, दरवर्षी सरासरी केवळ 4 हजार मुलेच दत्तक घेतली जातात, ही संख्या गरजेनुसार अत्यंत कमी आहे. यामुळे लाखो अनाथ मुले योग्य संगोपनाशिवाय आयुष्य जगत आहे. तर अपत्यासाठी इच्छुक जोडपी मानसिक ताणतणावातून जात आहे. ही दत्तक प्रक्रिया सुलभ होण्यासाठी नवी मुंबई येथील टेम्पल ऑफ हीलिंग संस्थेचे अध्यक्ष डॉ.पियुष सक्सेना यांनी सर्वोच्च न्यायालयात ऐतिहासिक जनहित याचिका (PIL) दाखल केली आहे. ही याचिका लाखो अनाथ मुलासाठी आणि अपत्य सुखाला आसुसलेल्या दांपत्यांसाठी नवीन आशेचा किरण निर्माण करणारी आहे.असा दावा डॉ.पियुष सक्सेना यांनी प्रेसक्लब मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केला.

यावेळी पत्रकार परिषदेला तृतीयपंथी गौरी सावंत, भारतात दत्तक घेण्यासाठीच्या कायदेशीर प्रक्रियेला अनेक वेळा खूप काळ लागतो. कडक नियम, दस्तऐवजांची पूर्तता, आणि तपासणी यामुळे अनेक पालक या प्रक्रियेकडे वळत नाहीत.येथे कुटुंबाचा “वंश” चालवण्यासाठी जैविक अपत्याला महत्त्व दिले जाते.मात्र येथे अनाथ मुलांचा विचार केला जात नाही. सध्या देशात अंदाजे 3.25 कोटी मुले अनाथ आहेत, तर दुसरीकडे 28 कोटी दाम्पत्य अपत्यहीन आहेत. या दोन्ही समस्यांवर दत्तक प्रक्रिया हा एक उत्तम उपाय होऊ शकतो. यासाठी याचिकाकर्ते डॉ सक्सेना यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.
या याचिकेचे मुख्य उद्दिष्टे दत्तक प्रक्रियेतील अवघड व वेळखाऊ प्रक्रियांना दूर करणे, दत्तक मुलांसाठी आणि इच्छुक पालकांसाठी केंद्रीकृत डिजिटल डेटाबेस तयार करणे,दत्तक प्रक्रियेवरील गैरसमज दूर करणे,अविवाहित, LGBTQ+ आणि इतरांना भेदभावविरहित दत्तक घेण्याचा अधिकार मिळवून देणे,हा होता.यात थोड्या प्रमाणात मला यश मिळाले आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारांकडून तातडीने उत्तर मागवले आहे, अनेक राज्यांनी त्यांच्या दत्तक धोरणांचे पुनरावलोकन सुरू केले आहे तसेच समाज आणि माध्यमांमध्ये या विषयावर सकारात्मक चर्चा सुरू झाली आहे. ही आत्तापर्यंतची प्रगती
आहे.असे डॉ सक्सेना यांनी सांगितले.

या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी ट्रान्सजेंडर कार्यकर्त्या गौरी सावंत प्रामुख्याने उपस्थित होत्या. दत्तक प्रक्रिया अनुभव कथन करताना, त्यांनी डॉ सक्सेना यांनी लाखो अनाथ मुलांसाठी आणि अपत्य सुखाला आसुसलेल्या दांपत्यांसाठी दाखल केलेल्या याचिकेचे समर्थन केले.तर अपघात आपले दोन्ही पाय गमावलेले व मूल दत्तक घेण्यास इच्छुक असलेले सुभाष पांडे यांनी दत्तक प्रक्रियेवर आसूड ओढले.

SW/ML/SL

11 Dec. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *