mmcnews mmcnews

महानगर

निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी सामुहिक

मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या राज्य सरकारमधून पदमुक्त करण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया दिली असून निवडणुकीतील पराभव ही सामुहिक जबाबदारी आहे. आम्ही तिन्ही पक्षांनी निवडणुकीत एकत्र काम केले होते असे त्यांनी म्हटले आहे. मतांची टक्केवारी पाहिली तर मुंबईत महायुतीला दोन लाख अधिक मते मिळाली. संविधान बदलणार हे […]Read More

देश विदेश

वीज पडण्याचा अलर्ट देणारे दामिनी ॲप

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मान्सून काळात वीज पडून शेतकऱ्यांसह अनेकांचा मृत्यू होतो. या घटना टाळण्यासाठी शासनाने ‘दामिनी: लाईटनिंग अलर्ट’ हे मोबाईल ॲप तयार केले आहे. हे ॲप भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाअंतर्गत असणाऱ्या भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संस्था, पुणे यांच्यामार्फत विकसित करण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातून खरीप पेरण्यांच्या दरम्यान शेतकऱ्यांना आपल्या शेताच्या […]Read More

देश विदेश

पराभवाची जबाबदारी स्वीकारत फडणवीसांची राजीनाम्याची तयारी

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काल लागलेल्या लोकसभा निवडणूकाच्या निकालामध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सरशी झाली. या निवडणूकीत भाजपला २८ पैकी फक्त १० जागांवर विजय मिळाला आहे. या पडझडीची जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची तयारी केली आहे. भाजपाची पिछेहाट जिव्हारी लागलेल्या फडणवीसांनी माध्यमांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, “महाराष्ट्रात भाजपला […]Read More

देश विदेश

World Cup क्रिकेटच्या मैदानात आज भारताची पहिली लढत आयर्लंडशी

न्यूयॉर्क, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यावर्षी प्रथमच Cricket World Cup ते सामने अमेरिकेच्या भूमीवर खेळवले जात आहेत. २ जून पासून सुरु झालेल्या या स्पर्धेमध्ये यावर्षी अमेरिकेचा संघही उतरला आहे. यजमान अमेरिका आणि कॅनडा यांच्यात झालेला पहिला सामना जिंकून अमेरिकेने या सामन्याचा शुभारंभ केला. आज भारताचा Cricket World मधील पहिला सामना आयर्लंडशी होत आहे. […]Read More

देश विदेश

केजरीवालांच्या न्यायालयीन कोठडीत १९ जूनपर्यंत वाढ

नवी दिल्ली, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी जामीनावर तुरुंगाबाहेर आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्लीतील मतदानानंतर २ जूनला पुन्हा तुरुंगात जावे लागले आहे. दिल्ली मद्य धोरणाशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणी राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने आज (5 मे) अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 19 जूनपर्यंत वाढ केली. केजरीवाल यांना न्यायालयातूनच VC मार्फत हजर […]Read More

देश विदेश

TATA च्या ‘या’ कंपनीचे होणार विलीनीकरण

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी टाटा मोटर फायनान्स लिमिटेडचे टाटा कॅपिटल लिमिटेडमध्ये विलीनीकरण करण्यास संचालक मंडळाने मान्यता दिली आहे. हा करार शेअर स्वॅपद्वारे पूर्ण केला जाणार आहे. टाटा मोटर फायनान्सचे शेअर स्वॅप डील अंतर्गत टाटा कॅपिटलमध्ये विलीन केले जातील, असे टाटा मोटरने जाहीर केले. टाटा मोटर्सने सांगितले की […]Read More

राजकीय

सुमार कामगिरीमुळे देवेंद्र फडणवीसांचे राजीनाम्याचे नाटक

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीत ४०० पार चा नारा देत निवडणुक लढवली तर महाराष्ट्रात ४५ जागा जिंकणार असा भाजपाचा अहंभाव होता परंतु देशातील जनतेप्रमाणे राज्यातील जनतेनेही भाजपाला त्यांची जागा दाखवून दिली आहे. महाराष्ट्रात भाजपाची कामगिरी अत्यंत खराब झालेली आहे याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाणीव झाली, आता केंद्रीय […]Read More

राजकीय

मुंबई पदवीधर मतदारसंघातून दीपक सावंत यांनी भरला अर्ज

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. दीपक रामचंद्र सावंत यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. सकाळी १०.३० वाजता विलेपार्ले पूर्व येथील पार्लेश्वर मंदिरात आशीर्वाद घेऊन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी डॉ.दीपक रामचंद्र सावंत शिवसैनिकांसह कोकण विभागीय आयुक्त कार्यालय , कोकण भवन , नवी मुंबई येथे पोहोचले. […]Read More

महानगर

भाजपचे ४०० पारचे स्वप्न भंगले, हाच मोदींचा पराभव

मुंबई दि.5(एम एमसी न्यूज नेटवर्क) : देशाच्या ऐतिहासिक सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल काल ४ जून रोजी जाहीर झाला. भाजपाने या निवडणुकीत विक्रमी मतदान घेऊन तिसऱ्यांदा सत्तेत येऊ, असे म्हटले होते. पण, जनतेने सत्ताधाऱ्यांचा ४०० पार चे स्वप्नभंग केले आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना लगावला. […]Read More

ट्रेण्डिंग

नरेंद्र मोदी यांनी दिला पंतप्रधानपदाचा राजीनामा

४ जूनला लोकसभा निवडणुकांचा निकाल लागला. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे दिला. लोकसभा विसर्जित करण्याचा प्रस्ताव कॅबिनेटच्या बैठकीत मंजूर झाला होता. तो प्रस्ताव राष्ट्रपतींकडे सादर केल्यानंतर राष्ट्रपतीनी पंतप्रधानपदाचा राजीनामा मंजूर केला. मात्र, नवीन सरकार येईपर्यंत मोदी काळजीवाहू पंतप्रधान असतील.Read More