mmcnews mmcnews

महानगर

चेंबूर शालेय परिसर तंबाखुमुक्त घोषित; १८७ दुकानांना नोटीस

मुंबई, दि. २८ (एम एमसी न्यूज नेटवर्क): परिमंडळ-७ मधील शालेय परिसर तंबाखुमुक्त करण्यासाठी पोलीस प्रशासनाने व्यापक मोहीम राबवत कठोर कारवाई केली. मुख्यमंत्री महोदयांच्या १०० दिवस कृती आराखड्यानुसार आणि पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या आदेशानुसार या मोहिमेला वेग देण्यात आला. पोलीस उप आयुक्त विजयकांत सागर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान हाती घेण्यात आले. या मोहिमेअंतर्गत परिमंडळ-७ चेंबूर […]Read More

सांस्कृतिक

टॅग ची ‘तिन्ही सांजा’ ठरली उत्तरार्ध सर्वोत्कृष्ट एकांकिका

ठाणे दि २८– जागतिक रंगभूमी दिनी म्हणजेच २७ मार्च २०२५ रोजी पन्नाशीपार तरुणांच्या दमदार कलाकृतींनी सजलेली उत्तरार्ध एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी दिमाखात पार पडली. ठाणे आर्ट्स गिल्ड च्या ‘तिन्ही सांजा’ एकांकिकेने प्रथम एकांकिकेचा बहुमान पटकावला. तसेच माय स्टेज पुणे संस्थेच्या सांजसावल्या ने द्वितीय, ब्रोकन कॅमेरा मुंबई च्या वन सेकंड्स लाईफ ने तृतीय तर सुप्रभा चॅरिटेबल […]Read More

देश विदेश

म्यानमार, बॅंकोकमध्ये 7.2 रिश्टर स्केलचा भूकंप, अनेक इमारती कोसळल्या

म्यानमार आणि थायलंडची राजधानी बँकॉक शहर शुक्रवारी दुपारी 12:50 च्या सुमारास भूकंपाच्या तीव्र झटक्यांनी हादरले. 7.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. म्यानमारमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे सांगितले जाते .थायलंडमधून धोकादायक चित्रे समोर येत असून अनेक इमारती कोसळल्या आहेत. थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये 14 मजली इमारत कोसळली आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने […]Read More

राजकीय

६४ लाख शेतकऱ्यांना मिळणार २५५५ कोटी नुकसान भरपाई

मुंबई, दि.२८ :– राज्यातील तब्बल ६४ लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून, त्यांच्या खात्यावर थेट रु. २५५५ कोटी विमा नुकसान भरपाई जमा होणार आहे. शासनाने विमा कंपन्यांना देय असलेला प्रलंबित राज्य हिस्सा अनुदान म्हणून रु. २८५२ कोटी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे मागील विविध हंगामांतील प्रलंबित नुकसान भरपाईची रक्कम […]Read More

ऍग्रो

हळद संशोधन केंद्र, सांगलीत सुरू करण्याची मागणी

सांगली दि २८ — सांगली ही पश्चिम महाराष्ट्रातील हळद खरेदी विक्रीची देशातील अग्रेसर बाजारपेठ आहे. या पेठेत महाराष्ट्राबरोबर आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू यासह अनेक राज्यातील शेतकरी आपली हळद विक्रीसाठी आणतात. हळद विक्री, प्रक्रिया, निर्यात यासह सर्व सुविधा सांगलीत आहेत. हळदीचे एग मार्क कार्यालय आणि हळद पूड तयार करण्याचे 50 कारखाने या भागात आहेत. राजापुरी हळद […]Read More

कोकण

चिपळूणमध्ये झाला तीन दिवसीय नमन महोत्सव…

रत्नागिरी दि २८:– सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या वतीने राज्यातील लोककला, लोकपरंपरा तसेच लोकसंस्कृतीचे जतन आणि संवर्धन व्हावे, नवीन पिढीला आपल्या उच्च संस्कृतीची आणि परंपरेची ओळख नव माध्यमातून व्हावी या उद्देशाने सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या अभिनव कल्पनेतून तथा सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०२५ चा कोकणातील पारंपरीक लोककलेचा […]Read More

देश विदेश

देशातील सामाजिक,राजकीय परिस्थिती आणि अर्थव्यवस्था ढासळणे चिंतेचा विषय

नवी दिल्ली, 28 : देशातील सामाजिक राजकीय परिस्थिती आणि अर्थव्यवस्था ढासळणे चिंतेचा विषय असल्याचे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षांच्या राष्ट्रीय नेत्यांनी बैठकीत व्यक्त केले. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या विस्तारित राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक दिल्लीत पार पडली. यास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, अनिल देशमुख यांच्यासह […]Read More

Lifestyle

आंबट-गोड आम्रखंड – पारंपरिक महाराष्ट्रीयन गोड पदार्थाची खास रेसिपी

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उन्हाळा सुरू झाला की आंब्याची चाहूल लागते आणि त्याबरोबरच आम्रखंड हा महाराष्ट्रीयन गोड पदार्थही लोकप्रिय होतो. दाटसर, मलईदार आणि आंबट-गोड चवीचे आम्रखंड जेवणात एक वेगळीच लज्जत आणते. चला, आज आपण ही सोपी आणि चविष्ट रेसिपी शिकूया. साहित्य: कृती: टिप्स: उन्हाळ्यात हा खास गोड पदार्थ नक्की करून पाहा आणि […]Read More

क्रीडा

खेलो इंडिया पॅरा स्पर्धा, महाराष्ट्र पदक तक्त्यात पाचव्या स्थानावर

नवी दिल्ली दि २७– महाराष्ट्राने नवी दिल्लीत संपलेल्या खेलो इंडिया स्पर्धेच्या टेबलटेनिसमध्ये पदकाचा षटकार झळकावला. 18 सुवर्णांसह 43 पदकांची लयलूट करीत महाराष्ट्राने पदक तक्त्यात पाचवे स्थान पटकावले. कोल्हापूरच्या दत्तप्रसाद चौगुले आणि विश्व तांबे यांनी सुवर्णपदकाला गवसणी देत राज्यासाठी स्पर्धेत सुवर्णसांगता केली. दिल्लीतील पॅरा खेलो इंडियाच्या दुसर्‍या पर्वात महाराष्ट्राने गत वर्षापेक्षा सरस कामगिरी केली. यंदा 18 […]Read More

महानगर

मुंबईत ‘क्लीन अप मार्शल’ची सेवा ४ एप्रिलपासून बंद

मुंबई दि.27(एम एमसी न्यूज नेटवर्क):मुंबई महानगरपालिकेने (BMC) नागरिकांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत शहरातील ‘क्लीन अप मार्शल’ची सेवा ४ एप्रिल २०२५ पासून थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. स्वच्छतेसाठी नियुक्त केलेल्या या मार्शलविरोधात वारंवार तक्रारी येत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिलेल्या निर्देशानुसार, ४ एप्रिलनंतर ‘क्लीन अप मार्शल’कडून दंड आकारणी होत […]Read More