mmcnews mmcnews

देश विदेश

भारताचे ‘सिटी ऑफ लिटरेचर’ म्हणून कोझिकोडला मिळाला मान, युनेस्कोने केले

भारताचे पहिले ‘सिटी ऑफ लिटरेचर’ उत्तर केरळमधील कोझिकोडला या शहराला घोषित करण्यात आले. समृद्ध सांस्कृतिक वारशासाठी ओळखल्या जाणाऱ्या या शहराला युनिस्कोने बहुमान देत तसे रविवारी जाहीर केले. युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कच्या (यूसीसीएन) ‘साहित्य’ श्रेणीत ऑक्टोबर २०२३ मध्ये कोझिकोडला स्थान मिळाले होते. दरम्यान केरळ राज्याचे स्थानिक स्वराज्य संस्था विभागाचे मंत्री एम. बी. राजेश यांनी रविवारी केरळ […]Read More

ट्रेण्डिंग

नीट पेपर फुटी प्रकरणात लातूरच्या दोन शिक्षकांना अटक

लातूर, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क): वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या अर्थात (नीट) पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे हे लातूरपर्यंत पोहोचल्याचे उघड झालं आहे. याप्रकरणी नांदेडच्या एटीएस च्या पथकाने पेपर फुटी प्रकरणातील संशयावरून शनिवारी रात्री संजय तुकाराम जाधव आणि जलील उमरखाँ पठाण या दोघांना ताब्यात घेऊन रविवारी नोटीस देऊन सोडून दिलं होतं. मात्र रविवारी सायंकाळी संजय तुकाराम जाधव आणि […]Read More

विदर्भ

राष्ट्र सेविका समितीचा प्रविण शिक्षा वर्गाचा समारोप

नागपूर, दि. २४(एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्र सेविका समितीचा प्रविण शिक्षा वर्गाचा समारोप काल नागपुरातील भोसला मिलिटरी स्कूल येथे संपन्न झाला. कार्यक्रमाला राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांतक्का उपस्थित होत्या तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रख्यात पंडवांनी गायिका पद्मश्री उषा बारले उपस्थित होत्या. महिलांनी भ्रम निर्माण करणाऱ्या विचारांपासून दूर राहावे सध्याच्या काळात त्यांनी वैचारिक योद्धा म्हणून काम […]Read More

महिला

आंतरराष्ट्रीय राजनैतिक क्षेत्रातील महिला विशेष दिन

मुंबई, दि. 24 (राधिका अघोर) :राजनैतिक क्षेत्रातील महिलांना समर्पित आंतरराष्ट्रीय दिन दुसऱ्या महायुद्धानंतर सगळ्या जगभरात सौहार्द आणि परस्पर सहकार्य टिकवून ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्था निर्माण झाल्या आणि हळूहळू त्यांच्याकडे अनेक जबाबदाऱ्या देखील आल्या. आजही सर्वच जागतिक प्रश्न सोडवण्यात आणि देशांमधील राजनैतिक संबंध सुरळीत ठेवण्यात अशा संस्था महत्वाच्या भूमिका बजावतात. संस्था म्हणजे त्यातील विविध पदांवरील माणसे. सुरुवातीला […]Read More

विदर्भ

विनाचालक ट्रॅक्टरद्वारे ऑटो पायलट ट्रॅक्टर पेरणी

अकोला, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शेती कामे करण्यासाठी वेळेवर मजूर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो त्यावर उपाय म्हणून तंत्रज्ञानाचा वापर करीत अकोला जिल्हयातील शेतकरी राजु वरोकार यांच्या शेतात विना चालक ऑटो पायलट ट्रॅक्टरद्वारे पेरणीचा आधुनिक प्रयोग यशस्वी ठरला असून ही यंत्रणा जीपीएस तंत्रज्ञानावर आधारीत आहे. अकोला जिल्ह्यात यावलखेड येथील तंत्रज्ञानस्नेही शेतकऱ्याने […]Read More

ट्रेण्डिंग

महाराष्ट्रातील दुर्गम भागात बाइक टॅक्सींचा प्रवेश, ग्रामीण आणि शहरी भागांसाठी

महाराष्ट्र राज्य सरकारने ग्रामीण आणि शहरी भागात बाइक टॅक्सी सेवेला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे दुर्गम आणि ग्रामीण भागांमध्ये सार्वजनिक वाहतुकीची सोय सुधारेल. यामुळे प्रवाशांना स्वस्त, जलद आणि सोयीस्कर पर्याय उपलब्ध होईल.बाइक टॅक्सी सेवा महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये सुरू केली जाणार आहे. यामुळे लोकांना कमी वेळेत आणि कमी खर्चात प्रवास करता येईल. अनेकांनी या निर्णयाचे स्वागत […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

पुण्यातील ड्रग्स पार्टी प्रकरणात सात जण अटकेत, अधिकाऱ्यांसह चौघांचे निलंबन

पुण्यातील एका ड्रग्स पार्टी प्रकरणात आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांसह चौघांचे निलंबन करण्यात आले आहे. या घटनेने पुणे शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या ड्रग्स पार्टीवर छापा टाकून काही प्रमाणात ड्रग्स जप्त केले आहेत. अटक केलेल्यांमध्ये काही प्रतिष्ठित व्यक्तींचाही समावेश आहे, ज्यामुळे या प्रकरणाने मोठे वळण घेतले आहे. या […]Read More

पर्यटन

ट्रेकिंगसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम किल्ल्यांपैकी एक

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : औरंगाबाद शहरापासून अवघ्या 15 किमी अंतरावर, हा 12व्या शतकातील किल्ला यादव राजकुमार भिल्लमा पंचम यांनी 1187 मध्ये बांधला होता. समुद्रसपाटीपासून 200 मीटर उंचीवर असलेल्या टेकडीवर वसलेल्या या किल्ल्यावरून दौलताबाद शहर दिसते. असा किल्ला बांधण्यात राजपुत्राच्या सामरिक तेजाची तुम्ही फक्त कल्पना करू शकता. विहंगम दृश्यांमुळे हा ट्रेकिंगसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम […]Read More

महाराष्ट्र

संत खंडोजी महाराज पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ

नंदुरबार, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : १९८ वर्षाची परंपरा असलेली संत खंडोजी महाराज संस्थानची दिंडी नंदुरबारहुन पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे. संत खंडोजी महाराज संस्थानची पायी दिंडी नित्य नेमाने नंदुरबारहून पंढरपुरला जात असते. कुकरमुंडा येथून या पारंपारिक दिंडीला सुरुवात झाली असून जिल्ह्याभरात ठिकठिकाणी दिंडीचे स्वागत करण्यात आले. उद्धव महाराज हे गेल्या ४० वर्षांपासून पंढरपुराची […]Read More

कोकण

शहरी बस वाहतुकीमध्ये देखील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास

रत्नागिरी, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य परिवहन विभागामध्ये रत्नागिरी आगाराच्या शहरी बस वाहतुकीमध्ये महाराष्ट्र राज्यातील ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना १००%, ६५ ते ७५ वर्षा पर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना ५० % तसेच महिलानां ५०% सवलत अनुज्ञेय करण्यात येत आहे. २२ जून मध्यरात्रीपासून अनुज्ञेय करण्यात येत असल्याची माहिती विभाग प्रमुख नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली. ७५ […]Read More