mmcnews mmcnews

विदर्भ

ऍड. डॉ. क्षितिजा वानखेडे यांची फोर्ब्सच्या यादीत नोंद

वर्धा, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : २००८ साली नागपूर विद्यापीठातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार विजेत्या वर्धा जिल्ह्याच्या ऍड. डॉ. क्षितिजा सुमित वानखेडे यांनी फोर्ब्स लिगल पावरलिस्ट या दोन प्रतिष्ठित श्रेणीमध्ये खटल्याच्या उत्कृष्ट परिणामाच्या भरोवशावर आणि समाजात स्त्रियांसाठी केलेल्या योगदानामुळे स्थान मिळविले आहे. फोर्ब्सने एकाच वर्षी दोन यादीत डॉ.क्षितिजा यांना सूचिबद्ध केले आहे. सर्वोत्कृष्ट संस्थापक आणि […]Read More

मराठवाडा

नीट परीक्षा घोटाळा ; कोर्टाने सुनावली 2 जुलै पर्यंत पोलीस

लातूर, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नीट परीक्षेतील उमेदवारांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या पैशाच्या मोबदल्यात अवैध मदत करण्याचे रॅकेट चालवणाऱ्या चार जणांविरोधात लातूरच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणातील जलिलखाॅं पठाण या संशयित आरोपीस रविवारी अटक करण्यात आली होती. आता या प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी संजय जाधव यास पोलिसांनी अटक केलीय. त्यास […]Read More

देश विदेश

असा दिसतो अंतराळातून राम सेतू, युरोपीयन स्पेस एजन्सीने टिपला फोटो

अंतराळातून राम सेतू कसा दिसतो त्याचा फोटो युरोपियन स्पेस एजन्सीने शेअर केला आहे. कोपर्निकस सेंटिनेल-2 या उपग्रहावरून हा फाटो घेतला आहे, तो एक्सवरून शेअर केला आहे. तमिळनाडूतील रामेश्वरम ते श्रीलंकेतील मन्नार बेटापर्यंत विस्तारलेला राम सेतू ही चुनखडीपासून तयार केला आहे, याला ॲडम्स ब्रिज म्हणूनही ओळखले जाते. राम सेतू १५ व्या शतकापर्यंत पार करण्यायोग्य होता, पण […]Read More

ट्रेण्डिंग

पुण्यातील पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर

पुण्यातल्या कल्याणीनगर भागामध्ये एका उद्योजकाच्या मुलाने भरधाव गाडी चालवत दोघांचा जीव घेतला होता.या पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. कोर्टात अल्पवयीन आरोपीच्या आत्याने याचिका केली होती. ही अटक बेकायदा असल्याचं याचिकाकर्त्याचे म्हणणे होते. दरम्यान, अल्पवयीन आरोपीला पुण्यातील बालगृहात ठेवण्यात आले होते. आता त्याला जामीन मिळाला आहे.Read More

ट्रेण्डिंग

देशाला मिळणार भरपूर सोनं! राजस्थानातील बांसवाडा शहरात सापडला मोठा साठा

देशाला आता भरपूर सोनं मिळणार आहे. कारण राजस्थानातील बांसवाडा येथील सोन्याच्या खाणीतून सोने काढण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. यासंदर्भातील लिलाव प्रक्रिया सरकारने पूर्ण केली आहे. ही खाण भविष्यात देशाला २५% सोन्याचा पुरवठा करू शकते. सोन्याच्या खाणीचा परवाना मिळविण्यासाठी देशातील अनेक बड्या कंपन्यांमध्ये स्पर्धा होती. यांपैकी दोन ब्लॉकसाठी मध्य प्रदेशातील रतलाम येथील सय्यद ओवेस अली फर्मला […]Read More

ऍग्रो

शेलूबाजार येथे डायरीयाची लागण; ४० रुग्ण बाधीत!

वाशिम, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील शेलु बाजार येथे गेल्या दोन दिवसांत जवळपास ४० लोकांना डायरीयाची लागण झाली असून काही रुग्णांना अकोला तर काहींना वाशीम येथे रेफर केल्याची माहीती वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत महाकाळ यांनी दिली. २२ जून रोजी १५ रुग्णांना डायरीया ची लागण झाल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुन पुढील उपचाराकरिता अकोला, वाशीम […]Read More

ट्रेण्डिंग

काळ आला होता पण वेळ आली नव्हती म्हणूनच…

बुलडाणा, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील चिखली नजीकच्या मेहकर फाट्यावर खाजगी लक्झरी बसने पेट घेतला सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही प्राणहानी झाली नाही परंतु लक्झरी बस पूर्णतः जळून खाक झाली. चंद्रपूर येथून लग्न समारंभ आटपून ही वऱ्हाडी मंडळी घेवुन बुलढाण्याकडे येत होती. आज 25 जूनच्या सकाळी पाच वाजताच्या सुमारास चिखली शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर […]Read More

ट्रेण्डिंग

अफगाणिस्तानचा ऐतिहासिक विजय, ऑस्ट्रेलिया वर्ल्डकपमधून बाहेर!

आज सकाळी झालेल्या क्रिकेट विश्वचषकाच्या सामन्यात अफगाणिस्तानने बांगलादेशवर विजय मिळवून क्रिकेट जगात एक नवीन इतिहास रचला आहे. या विजयामुळे अफगाणिस्तानची टीम थेट सेमीफायनलमध्ये पोहोचली असून, त्यांच्या खेळाडूंच्या अद्वितीय कामगिरीचे कौतुक होत आहे. ऑस्ट्रेलियाच्या पराभवामुळे त्यांचे वर्ल्डकपमधील स्वप्न भंगले आहे. अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी दाखवलेल्या संयम आणि समर्पणाने त्यांना विजयाच्या उंचीवर नेले आहे. संपूर्ण क्रिकेट जगाने या विजयाला […]Read More

देश विदेश

अयोध्येतील श्रीराम मंदिरात पहिल्याच पावसात गळती

अयोध्या, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अयोध्येतील श्रीराममंदीरात यावर्षी पहिल्याच पावसात गळतीचा सामना करावा लागला आहे. अयोध्येत शनिवार-रविवारच्या रात्री 67 मिमी पाऊस झाला, त्यामुळे संपूर्ण शहर जलमय झाले. रस्ते धसले आहेत. सहा महिन्यांपूर्वी बांधलेली अयोध्या धाम रेल्वे स्थानकाची अंदाजे 20 मीटर लांबीची सीमा भिंतही कोसळली. दरम्यान राममंदिरात झालेल्या गळतीबद्दल बोलताना मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र […]Read More

शिक्षण

NEET UG च्या पुनर्परीक्षेत 1563 पैकी 750 विद्यार्थी गैरहजर

नवी दिल्ली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 5 मे रोजी झालेल्या NEET परीक्षेच्या निकालात ग्रेस गुण मिळालेल्या 1563 उमेदवारांसाठी रविवारी पुनर्परीक्षा घेण्यात आली. परीक्षा दुपारी 2 ते 5:20 या वेळेत होणार होती. 1563 पैकी केवळ 813 उमेदवार परीक्षेला बसले होते. 750 उमेदवार परीक्षेला बसले नाहीत. चंदीगडमध्ये फक्त दोन उमेदवारांसाठी परीक्षा केंद्र बनवण्यात आले होते, […]Read More