मुंबई, दि. 4 : मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत अप्रतिम अभिनय आणि नृत्यकौशल्याने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम (८७) यांचे आज निधन झाले. संध्या या व्ही शांताराम यांच्या पत्नी होत्या. आज सकाळी साडे दहा वाजता परळ येथील राजकमल स्टूडिओमधून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क येथील वैकुंठधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. […]Read More
मुंबई, दि.४ : राज्य सरकारने २ सप्टेंबर रोजी काढलेल्या शासन निर्णयामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का बसणार आहे. हा शासन निर्णय रद्द करावा तसेच २०१४ पासून दिलेली कुणबी प्रमाणपत्र आणि जातपडताळणी प्रमाणपत्र याची श्वेतपत्रिका काढावी या दोन मागण्या आज ओबीसी संघटनांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी नागपूरात […]Read More
पुणे प्रतिनिधी –म्हाडाच्या भोंगळ कारभारामुळे पुण्यातील म्हाडाच्या रहिवाशांची अवस्था दयनीय झाली असून म्हाडाच्या अनागोंदी कारभारामुळे “कोणी नवीन घर देत का घर” अशी नागरिकांची अवस्था झाली आहे. पुणे लोकमान्यनगर बचाव कृती समितीच्या वतीने व महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड पुनर्विकास कृती समिती येरवडा यांच्यावतीने (ता. ३) रोजी पुणे स्टेशन येथील म्हाडाच्या इमारतीला शेकडो नागरिकांनी घेरावा घातला होता. यावेळी […]Read More
मुंबई, दि. ४ : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे, हे लक्षात घेऊन राज्यातील सर्व संवर्गातील पदांच्या सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्यात येणार आहे, असे सांगून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पदभरती प्रक्रिया गतीशील करून २०२६ या वर्षात मोठ्या प्रमाणात पदभरती करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]Read More
मुंबई, दि. ३- माजी खासदार, आमदार व समाजसेवक स्व.दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे, यासाठी ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील व भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. स्व.दि.बा.पाटील यांचेच नाव विमानतळाला देण्यात येणार असून दिल्लीला तसा प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले असल्याचे खा. […]Read More
सिंधुदुर्ग दि ३ : जिल्ह्यातील शिरोडा – वेळागर येथील समुद्रात दुपारी ४:४५ दरम्यान ८ पर्यटक बुडाल्याची घटना घडली आहे. सदर पर्यटकातील ४ जणांना समुद्रातून बाहेर काढण्यात आलेले आहे. यातील ३ पर्यटक मयत असून एक पर्यटक (महिला) अत्यवस्थ आहे. सदर महिलेस शिरोडा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. उर्वरित ४ पर्यटकांचा शोध स्थानिक शोध व […]Read More
मुंबई, दि. ३ : उद्धव ठाकरेंचे दसरा मेळाव्यातील भाषण म्हणजे, ‘विकृत मानसिकतेचे प्रदर्शन’, अशी टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. मुंबईत पत्रकारांना त्यांनी सांगितले की, “विधानसभा निवडणुकीत पराभव आणि येणाऱ्या निवडणुकीत विजयाची चिन्हे नसल्याने ठाकरे यांची मानसिकता विकृतीकडे गेली आहे. ५१ टक्क्यांहून अधिक मतांसह भाजपासह महायुतीची घौडदौड सुरू आहे. अशा परिस्थितीत आत्मविश्वासाने काम करायला […]Read More
मुंबई, दि. ३ : राज्यात अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाली होती. ही परिस्थिती तसेच विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर आणि शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या ३० सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या बैठकीतील निर्देश यांचा विचार करुन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत विद्यार्थ्यांना अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची शेवटची संधी देण्यात येत आहे. […]Read More
मुंबई, दि. ३ : RBIने चेक क्लिअरन्सची प्रक्रिया जलद करण्यासाठी आणि पेमेंट सुरक्षा वाढवण्यासाठी अद्ययावत केलेली सेटलमेंट फ्रेमवर्क लागू केली आहे. त्यानुसार 4 ऑक्टोबरपासून बँका त्याच दिवशी चेक क्लिअर करतील. सध्या चेक ट्रंकेशन सिस्टीम (CTS) द्वारे चेक क्लिअरन्स बॅच-प्रोसेसिंग पद्धतीने चालतो. बँकांनी जाहीर केले आहे की- 4 ऑक्टोबरपासून जमा केलेले चेक त्याच कामाच्या दिवशी काही […]Read More
नवी दिल्ली, दि. ३ : प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या पत्नी गीतांजली अँगमो यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून हस्तक्षेपाची विनंती केली आहे. लडाखमधील जनतेच्या भावना समजून घेण्यासाठी राष्ट्रपतींच्या आदिवासी पार्श्वभूमीचा उल्लेख करत त्यांनी वांगचूक यांच्या विनाशर्त सुटकेची मागणी केली आहे. हे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री […]Read More