अमित शाहांनी कसे जिंकवून दिले बंगाल?

 अमित शाहांनी कसे जिंकवून दिले बंगाल?

भाजपच्या ऐतिहासिक विजयामागील ‘चाणक्य’ नीती; काय ठरले महत्त्वाचे मास्टरस्ट्रोक?

( विक्रांत पाटील )

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेला विजय हा भारतीय राजकारणातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या मोहिमांपैकी एक होता. ममता बॅनर्जी यांच्या १५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावत भाजपने बंगालचा गड सर केला आहे. या विजयाचे मुख्य शिल्पकार म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे पाहिले जात आहे.

बंगालमध्ये ‘क्लॅरिटी’ जिंकली, ‘कन्फ्युजन’ हरले. अमित शाह यांची रणनीती ही स्पष्टता आणि आक्रमकता यावर आधारित होती. त्यांनी विरोधकांच्या बालेकिल्ल्यात घुसून त्यांच्याच मुद्द्यांवर त्यांना घेरले. या विजयाने अमित शाह हे भाजपच्या विस्तारवादी धोरणाचे ‘मास्टर स्ट्रॅटेजिस्ट’ असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

शाहांनी आखलेली नेमकी ती ४ सूत्रे कोणती, ज्यामुळे बंगालमध्ये कमळ फुलले?

१. ‘बूथ लेव्हल’ मायक्रो-मॅनेजमेंट (पन्ना प्रमुख)
अमित शाह यांच्या रणनीतीचा सर्वात महत्त्वाचा स्तंभ म्हणजे संघटनेची तळागाळातील बांधणी. त्यांनी बंगालमध्ये केवळ मोठ्या सभांवर अवलंबून न राहता ‘पन्ना प्रमुख’ आणि ‘बूथ स्तरावरील’ कार्यकर्त्यांचे जाळे विणले. प्रत्येक बूथवर पक्षाची पकड मजबूत करण्यासाठी त्यांनी विशेष टीम तैनात केल्या होत्या, ज्यांनी मतदानाच्या दिवसापर्यंत प्रत्येक मतदाराशी थेट संपर्क ठेवला.

२. प्रस्थापित विरोधी लाटेचे (अँटी- इन्कम्बन्सी) अचूक भांडवल
बंगालमधील जनतेत तृणमूल काँग्रेसविरोधात असलेला असंतोष शाहांनी ओळखला होता. आरजी कर रुग्णालय प्रकरण असो किंवा स्थानिक स्तरावरील भ्रष्टाचार, अमित शाहांनी या मुद्द्यांना राष्ट्रीय स्तरावर नेऊन ‘न्याय आणि बदल’ हा नॅरेटिव्ह अत्यंत प्रभावीपणे मांडला. विशेषतः महिला सुरक्षेचा मुद्दा त्यांनी प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवला, ज्याचा मोठा फटका ममता बॅनर्जींना बसला.

३. ‘आय-पॅक’ आणि रणनीतीवर मानसिक आघात
ममता बॅनर्जी यांची शक्ती मानल्या जाणाऱ्या रणनीतीकार संस्था आणि त्यांच्या नियोजनावर अमित शाहांनी राजकीय आणि कायदेशीर दबावाच्या माध्यमातून ‘मानसिक मात’ केली. निवडणुकीच्या मोक्याच्या क्षणी विरोधकांची रणनीती विस्कळीत करणे आणि त्यांच्यातील अंतर्गत गोंधळ चव्हाट्यावर आणणे, हे शाहांच्या रणनीतीचे वैशिष्ट्य ठरले. यामुळे तृणमूलचा बचाव कमकुवत झाला.

४. सोशल इंजिनिअरिंग आणि सातत्यपूर्ण संपर्क
अमित शाह यांनी बंगालमध्ये केवळ हिंदू मतांचे ध्रुवीकरण न करता, मतुआ समुदाय, अनुसूचित जाती आणि जमाती (एससी/एसटी) यांच्यामध्ये भाजपची स्वीकारार्हता वाढवण्यासाठी विशेष योजना राबवल्या. त्यांनी स्वतः बंगालचे शेकडो दौरे करून स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधला. “बंगाल हा भाजपसाठी केवळ निवडणूक नसून अस्मितेचा लढा आहे,” हे त्यांनी कार्यकर्त्यांच्या मनावर ठसवले.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *