MPSC चा मोठा निर्णय, विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश
मुंबई,दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मागील काही दिवसांपासून विद्यार्थी आयोगाविरोधात आंदोलन करत होते. अखेर विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश आलं आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत आहे. याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ट्विट करून माहिती दिली.
नुकतीच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आयोग, विद्यार्थी प्रतिनिधी यांचं बैठक घेण्याचं ठरलं होतं. ही बैठक आज नियोजित होती. मात्र बैठक न घेताच आयोगाने आज विद्यार्थ्यांच्या बाजुने निर्णय दिला.
विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या
एमपीएससीच्या मुख्य परीक्षेसाठी लागू करण्यात आलेला नवा अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करावा.
नवा पॅटर्न लागू करण्याची घाई करु नये.
परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मुलांना किमान ५ ते ६ महिने वेळ मिळावा.
नवा अभ्यासक्रम यूपीएससीच्या (UPSC) अभ्यासक्रमाप्रमाणे आहे. या अभ्यासक्रमाची पुस्तके मराठीतून उपलब्ध नाहीत, त्यामुळे त्यात सुधारणा करण्यात यावी .
SL/KA/SL
23 Feb. 2023