बलाढ्य ऑस्ट्रेलियाची ‘कसोटी’, भारतीय गोलंदाजांची कमाल
मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मोठ्या कालावधीनंतर भारतात ऑस्ट्रेलियाचा महिला संघ कसोटी सामना खेळत आहे. आजपासून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्याला सुरूवात झाली. आयसीसी स्पर्धांसह द्विपक्षीय मालिकेत वर्चस्व असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला भारतीय संघाने मोठे आव्हान दिले. खरं तर ऑस्ट्रेलियन संघाने अनेकदा मोठ्या व्यासपीठावर भारताचा पराभव केला आहे. मात्र, आज चित्र काहीसे वेगळे दिसले अन् भारताने पहिल्यादिवसाअखेर मजबूत पकड बनवली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाहुण्या ऑस्ट्रेलियाने ७७.४ षटकांत सर्वबाद केवळ २१९ धावा केल्या. पाहुणा संघ लवकर बाद झाल्यानंतर यजमानांना पहिल्याच दिवशी पुरेशी फलंदाजी करण्याची संधी मिळाली.
ML/KA/PGB 22 Dec 2023