राज्यातील 30 टक्के फिडर सोलरवर आणणार
अहमदनगर, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): येत्या दोन वर्षांमध्ये राज्यातील 30 टक्के फिडर हे आमचं सरकार सोलरवर आणणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल आणि शेतकऱ्यांना शेती करताना होणारी गैरसोय दूर होईल असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील गटेवाडी येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कन्हैया ऍग्रो कंपनीच्या विस्तारित प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आदी उपस्थित होते.30 percent feeders in the state will be brought on solar
ML/KA/PGB
11 Mar. 2023