Month: February 2024

विज्ञान

पंतप्रधानांनी जाहीर केली गगनयान मोहिमेवर जाणाऱ्या अंतराळवीरांची नावं

तिरुवनंतपुरम, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय अवकाश संशोधन संस्थेत ( ISRO) आता देशाच्या विज्ञान क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा गगनयान मोहिमेची तयारी सुरु आहे. या मोहिमेद्वारे अंतराळात जाणाऱ्या अंतराळवीरांची नावे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळमधील तिरुवनंतपुरम येथील विक्रम साराभाई स्पेस सेंटरला (VSCC) भेट देत सुमारे 1800 […]Read More

पर्यावरण

गारगाई धरणामुळे जैवविविधता धोक्यात

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गारगाई धरणाच्या बांधकामामुळे सह्याद्रीच्या वायव्येकडील भाग आणि पालघर जिल्ह्यातील तानसा वन्यजीव अभयारण्यातील वन्यजीवांच्या मुक्त संचारावर निर्बंध येणार आहेत. शिवाय, त्या भागातील इकोसिस्टमवर नकारात्मक परिणाम होईल. परिणामी, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने (बीएनएचएस) या प्रदेशात कोणत्याही बांधकामाला विरोध दर्शवला आहे. त्यांच्या निषेधार्थ बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने केंद्रीय पर्यावरण, वने आणि […]Read More

महिला

झाडाच्या टोकावर बसून करतेय राम नामाचा जप

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सोशल मीडियाच्या युगात तुमच्या लाइक्स आणि फॉलोअर्सची संख्या अत्यंत महत्त्वाची आहे. काही व्यक्तींना सोशल मीडियाचे इतके वेड असते की त्यांच्या पोस्टला लाईक्स न मिळाल्यास त्यांना रात्री झोपही येत नाही. तथापि, जर तुमची पोस्ट व्हायरल झाली, तर तुमच्याकडे लक्षणीय रक्कम कमावण्याची क्षमता आहे. हे या सोशल मीडिया निर्मात्यांना आणखी […]Read More

करिअर

TGT आणि PGT च्या 1,613 पदांसाठी भरती

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आसाममधील कोक्राझार जिल्ह्यात, शिक्षण विभागाने प्रशिक्षित पदवीधर शिक्षक आणि पदव्युत्तर शिक्षकांच्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. सध्या या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. उमेदवार recruitment.bodoland.gov.in वर क्लिक करून अर्ज करू शकतात. रिक्त जागा तपशील: प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) – 1,413 पदेपदव्युत्तर शिक्षक (PGT) – १४१ पदेशैक्षणिक पात्रता: बॅचलर इन […]Read More

महानगर

शिळ्या कडीला ऊत आणणारा अंतरिम अर्थसंकल्प

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील शेतकरी, बेरोजगार, मध्यमवर्गीयांची फसवणूक करणारा अर्थहीन अर्थसंकल्प आज राज्य सरकारने सादर केला आहे. विकासाचे दिवास्वप्न दाखवणारा अर्थसंकल्प सरकारने राज्याच्या माथी मारला आहे. 99 हजार कोटींची राजकोषीय तूट म्हणजे राज्याची दिवाळखोरीकडे वाटचाल सूरू झाली हे आता लपून राहिले नाही. फसव्या घोषणा अन् पोकळ आश्वासनांची रेलचेल या अर्थसंकल्पात आहे. […]Read More

महानगर

अर्थसंकल्पाची माहिती देण्यासाठी आलेल्या सरकारला पत्रकारांनी धरले धारेवर

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र विधानमंडळात आज सादर करण्यात आलेल्या अंतरीम अर्थसंकल्पाची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री शंभुराज देसाई, संजय बनसोडे हे विधानभवनातील पत्रकार कक्षात आले. राज्यातील सर्वच घटकांना न्याय देणारा अंतरिम अर्थसंकल्प असल्याची स्तुतीसुमने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री आणि […]Read More

राजकीय

खर्चासाठी 6 लाख 522 कोटीची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प सादर

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याच्या 2024-25 वर्षाच्या एकूण खर्चासाठी 6 लाख 522 कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत तर मंत्री दीपक केसरकर यांनी विधानरिषदेत सादर केला. अर्थसंकल्पामध्ये 4 लाख 98 हजार 758 कोटी रुपये महसुली जमा आणि 5 लाख 8 हजार 492 कोटी रुपये […]Read More

राजकीय

राज्याची आर्थिक नियोजन शिस्त बिघडल्याने पुरवणी मागण्या फसणार

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्येक अधिवेशनात सरकारला सातत्याने पुरवणी मागण्या सादर कराव्या लागत आहेत, यावरून राज्यातील आर्थिक नियोजनाची शिस्त बिघडली असल्याचे सिद्ध होते, अशा शब्दांत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर हल्लाबोल केला. ६ लाख २ हजार ०८ कोटी रुपयांचा २०२३-२४ चा अर्थसंकल्प सरकारने मांडलेला आहे. तर पावसाळी अधिवेशनात ४१ […]Read More

राजकीय

जरांगेनी फडणवीसांवर लावलेल्या आरोपांची SIT चौकशी करा

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा समाजाच्या आरक्षणावरुन सरकारने राज्यात वाद निर्माण केले आहेत, सरकारच समाजा-समाजात तेढ निर्माण करत आहे. मराठा समाजावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण बिघडलेले आहे. मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात काय बोलणे झाले हे जाहीर करण्याची मागणी काँग्रेस सातत्याने करत आहे. आता मनोज जरांगे पाटील यांनी […]Read More

राजकीय

कोयना (शिव सागर) धरणात विकसित होणार जागतिक दर्जाचे जलपर्यटन

मुंबई, दि.२७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील मुनावळे येथे शिव सागर जलाशय मध्ये जागतिक दर्जाचे जल पर्यटन विकसित करण्यात येणार आहे. या जल पर्यटन सुविधेमुळे या परिसरातील पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये […]Read More