Month: February 2024

पर्यावरण

विद्यार्थ्यांनी घेतला गाव प्लास्टिकबॅग मुक्तीचा ध्यास !

यवतमाळ, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आजची भीषण समस्या म्हणजे वाढते प्रदुषण, या प्रदुषणाला अनेक घटक जबाबदार आहेत. त्यात एक प्रमुख म्हणजे कॅरीबॅगचा अर्थात प्लास्टिक पन्नीचा बेसुमार वापर. भाजी आणणे असो की किराणा आणणे असो , अनेक जण प्लास्टिक पन्नीतच या वस्तू आणतात, ती घरात आणली की साहजिकच ती कॅरीबॅग घराबाहेर फेकून दिली जाते. […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

पंढरपुरात रंगला माघी एकादशीचा अनुपम्य सोहळा …

सोलापूर, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी या संत उक्तीप्रमाणे माघी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपुरात पाच लाख भाविकांची मांदियाळी जमली आहे. पहाटेपासूनच चंद्रभागातीर, विठ्ठल मंदिर परिसर हा भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे. पहाटे विठ्ठलाची नित्यमहापूजा समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर आणि शकुंतला नडगिरे यांच्या हस्ते झाली. आणि एकादशीच्या अनुपम्य सोहळ्यास सुरुवात झाली. […]Read More

बिझनेस

टाटा कंपनी करणार धार्मिक पर्यटन क्षेत्रात मोठी गुंतवणूक

मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशात सध्या धार्मिक पर्यटनाचे वारे वाहत असताना विविध कंपन्या याचा फायदा घेत आहेत. टाटा समुहाची कंपनी इंडियन हॉटेल्सने सांगितले की त्यांचे लक्ष आता धार्मिक पर्यटनावर आहे. याअंतर्गत कंपनी धार्मिक स्थळांवर हॉटेल चेनचा विस्तार करणार आहे. कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, हे पाऊल जागतिक स्तरावर मोठी भूमिका बजावेल. […]Read More

बिझनेस

Paytm च्या शेअर्समध्ये 5 टक्क्यांनी वाढ

मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सक्तवसुली संचालनालयाला (ED) कडून क्लिनचिट मिळाल्यावर आता पेटीएमच्या शेअर्सने चांगलीच उसळी घेतली आहे. सक्तवसुली संचालनालयाला (ED) त्यांच्या तपासणीत आढळून आले की पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडने परकीय चलन व्यवस्थापन कायदा (फेमा) अंतर्गत कोणत्याही नियमांचे उल्लंघन केले नाही. पेटीएमचे शेअर्स आज 100 टक्क्यांच्या वरच्या सर्किटवर पोहोचले आहेत. त्यानंतर बीएसईमध्ये कंपनीच्या […]Read More

देश विदेश

उद्या देशाला मिळणार ३ नवीन IIM, ४ IIT-IIS आणि २०

नवी दिल्ली, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी जम्मू मध्ये ३० हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकास प्रकल्पांचा शुभारंभ व भूमिपूजन करतील. यामध्ये जम्मू-काश्मीरला उर्वरित भारताला जोडणारी उधमपूर-बनिहाल रेल्वेमार्गाचा समावेश आहे. पंतप्रधानांच्या कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रात मोठी गुंतवणूक सामील आहे. देशातील शिक्षण व कौशल्या विकासाच्या दिशेने हे महत्वपूर्ण पाऊल आहे. पीएम मोदी […]Read More

देश विदेश

शरद पवार यांना आठवडाभरात नवीन चिन्ह द्या, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

नवी दिल्ली, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.आजच्या सुनावणीत न्यायालयाने राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला दिलासा देणारा निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष व चिन्ह अजित पवार गटाला दिल्यानंतर शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आज शरद पवार गटाचा युक्तीवाद ऐकल्यानंतर […]Read More

पर्यावरण

कृष्णा नदीच्या प्रदुषणाबद्दल सांगली मनपाला ९० कोटींचा दंड

मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्राच्या जीवनवाहिन्यांपैकी एक प्रमुख नदी असलेल्या कृष्णा नदीच्या प्रदुषणाने गेल्या काही वर्षांपासून गंभीर रूप धारण केले आहे. यामुळे जलचरांचे जीवन धोक्यात आले आहे. याला कारणीभूत आहेत ते नदीकाठावरील कारखान्यांत तयार होणारे रसायनयुक्त पाणी. या गंभीर समस्येला जबाबदार असल्याचा ठपका ठेवत आता प्रदुषण महामंडळाने सांगली पालिकेवर कडक कारवाईचा बडगा […]Read More

पर्यावरण

छत्रपतींचे जन्मस्थानी बहरली ‘शिवाई देवराई’ !

, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावरील ‘शिवाई देवराई’ आणि वन उद्यानाचे लोकार्पण शिवजयंतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटनमंत्री गिरीश महाजन कार्यक्रमाला उपस्थित असतील, अशी माहिती जुन्नर वन विभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी दिली. संवर्धन आणि विकास प्रकल्पा […]Read More

देश विदेश

भारतीय लष्कराच्या सामर्थ्यांला मिळणार AI ची जोड

नवी दिल्ली, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भविष्यातील AI चे वाढणारे महत्त्व लक्षात घेऊन भारतीय लष्कराने आता या तंत्रज्ञानाची मदत घेण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. लष्कराने T-72 रणगाड्याच्या जागी आधुनिक लढाऊ वाहन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. चीनसोबतच्या तणावानंतर लष्कर हलक्या रणगाड्यांवर भर देत आहे. भारतीय लष्कर येत्या काही वर्षांत अत्याधुनिक शस्त्रे आणि […]Read More

पर्यटन

भगवान विष्णूचे पवित्र मंदिर, बद्रीनाथ मंदिर

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बद्रीनाथ मंदिर हे भगवान विष्णूचे पवित्र मंदिर आहे आणि भारतातील चार चार धामांपैकी एक आहे. हे उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात आहे. हे मंदिर 10,279 फूट उंचीवर एका सुंदर हिमालयाच्या रांगेने वेढलेले आहे आणि अलकनंदा नदी वाहते. बद्रीनाथ मंदिरात तप्त कुंड नावाचा गरम पाण्याचा झरा आहे, ज्याचे औषधी मूल्य आहे […]Read More